गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
उद्योग, पायाभूत सुविधा विकास आणि जिल्हा पालकमंत्री एम. बी. पाटील यांनी जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या गारपिटीमुळे आणि वादळामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वसमावेशक सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
नुकत्याच झालेल्या वादळ आणि गारपिटीमुळे कृषी आणि फळबाग पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर, अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पीक नुकसानीचे सर्वेक्षण तात्काळ करण्यात यावे. या सर्वेक्षणात कोणत्याही बाधित शेतकऱ्याचे नाव सुटणार नाही याची काळजी घ्यावी. कृषी, फळबाग आणि महसूल विभागांनी संयुक्त सर्वेक्षण करावे. तसेच, मंत्र्यांनी जिल्हाधिकारी डॉ. गिवन आनंद के. यांनाही निर्देश दिले आहे.
याप्रसंगी, मंत्र्यांनी फळबाग विभागाचे सहसंचालक राहुल दोडमणी आणि कृषी विभागाचे सहसंचालक शिवनागौडा पाटील यांच्याशीही चर्चा केली आणि पीक नुकसानीचे सर्वसमावेशक व शास्त्रीय पद्धतीने सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
