परीक्षेत नापास झाल्याने विद्यार्थ्यानीची आत्महत्या
विजयपुर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
एसएसएलसीचा (दहावी) निकाल जाहीर झाल्यानंतर काही तासांतच, चडचाण तालुक्यातील हालसंगी गावात एका नापास विद्यार्थिनीने तिच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे
मृत विद्यार्थिनीचे नाव भाग्यश्री राजेंद्र हुगर (वय १६) असे आहे,
यावर्षीची एसएसएलसी परीक्षा देणारी भाग्यश्री हुगार ही परीक्षा उत्तीर्ण होण्याची आशा बाळगून होती. पण निकाल जाहीर झाला तेव्हा ती सर्व विषयांमध्ये नापास झाली, ज्यामुळे ती निराश होऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे
झळकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार दुपारी भाग्यश्रीने तिचे आईवडील घरी नसल्याचे पाहून तिच्या खोलीच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.
