आगीत १५ वाहने जळून खाक
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने १५ वाहने जळून खाक झाली आहेत. विजयपूर गांधी चौक पोलिस ठाण्याच्या मागील भागात ही घटना घडली. अपघात आणि इतर प्रकरणांमध्ये जप्त केलेली सुमारे १५ वाहने जळून खाक झाली.
आगीमुळे टायरचा स्फोट होऊन आग वेगाने पसरली. इतर वाहनांना देखील आग लागली. स्थानिक अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले आणि आग इतरत्र पसरू न देण्यासाठी उपाययोजना केली. गांधी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.