पाणी पिण्यासाठी विहिरीत उतरलेल्या आजी- नातवाच्या मृत्यू
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
पाणी पिण्यासाठी विहिरीत उतरलेला बालक पाय घसरून पाण्यात पडला आणि त्याला वाचवण्यासाठी उतरलेली आजीही पाण्यात पडली आणि दोघेही मृत्युमुखी पडल्याची घटना इंडी तालुक्यातील अगसनाळ गावात घडली आहे.
विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील अगसनाळ गावातील शेतात ही घटना घडली असून असद मुल्ला (वय१२), सलीमा मुल्ला (वय ५५) या मृत आजी आणि नातवाचे नाव आहे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून पोलीस मृतदेहांची पोस्टमॉर्टम तपासणी करून कुटुंबीयांना सोपविण्यात आले आहे. होर्ती पोलिस ठाण्यात या दुर्घटनेची नोंद करण्यात आली आहे.