रस्ता अपघातात दोन युवकांचा मृत्यू
विजयपूर/प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
कँटर आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात होऊन दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून राष्ट्रीय महामार्ग 52 वर बीळगी जवळील बाडगंडी परिसरात धारवाड येथील मिश्र पेढा वाहतूक करणाऱ्या कँटर आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. दुचाकीवरील कोल्हार नगर पंचायत अध्यक्ष चन्नमल्लप्पा गिड्डप्पगोळ यांचा तिसरा मुलगा गुरु गिड्डप्पगोळ (वय 32) तसेच कल्लप्पा काखंडकी यांचा मोठा मुलगा बसवराज काखंडकी (वय 27) हे दोघे युवक जागीच मृत्युमुखी पडले.घटनास्थळी बीळगी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली.
