Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

राजकारण बाजूला ठेवून ऐतिहासिक विजयपूर शहराचा विकास निधी आणावं - सत्यजित पाटील

Responsive Ad Here


राजकारण बाजूला ठेवून ऐतिहासिक विजयपूर शहराचा विकास निधी आणावं - सत्यजित पाटील







विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

 राजकीय हेतूने  विरोधी राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांनी पर्यटनस्थळ असलेल्या ऐतिहासिक विजयपूर शहराच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून निधी आणण्यासाठी राजकीय स्पर्धा करावी आणि यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, अशी मागणी कर्नाटक प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव सत्यजित एस. पाटील यांनी केली.

शहरात पक्ष संघटनेच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मंञुनाथ यांच्यासोबत विश्वगुरू बसवेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासह विविध महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून, श्री सिद्धेश्वर मंदिरात विशेष पूजा केली. तसेच हसिंपीर दरगाहचे दर्शन घेऊन ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 विजयपूर हे  ऐतिहासिक शहर असून, येथे स्थानिक स्तरावर हजारो रोजगार निर्माण करून, बेरोजगारी दूर करण्यासाठी पर्यटन विकासाला प्राधान्य द्यावे लागेल,

विजयपूर शहरात प्रसिद्ध गोलघुमट, इब्राहीम रौजासारखी अनेक जागतिक कीर्तीची स्मारके असून, अशा ऐतिहासिक वैभव असलेल्या विजयपूरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पर्यटन क्षेत्रात मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष निधी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

या जागतिक दर्जाच्या स्मारकांचे पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक विजयपूरला भेट देतात. मात्र, पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या या स्मारकांच्या जतनासाठी व आवश्यक सोयी-सुविधांसाठी केंद्र सरकारने कोणतीही विशेष काळजी घेतलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रात गेल्या तीन कार्यकाळापासून सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने शहरी विकास आणि पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून विजयपूर या पारंपरिक शहराचे 'मॉडेल सिटी' म्हणून रूपांतर करण्याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप त्यांनी केला.

इतिहास, संस्कृती आणि पर्यटन यांचा संगम असलेले विजयपूर शहर जर पर्यटनदृष्ट्या प्रगत झाले, तर स्थानिक पातळीवर हजारो तरुणांना थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळू शकतो. त्यामुळे विजयपूर शहर देशाच्या नकाशावर ठळकपणे उभे राहू शकते. म्हणूनच विकासासाठी राजकीय स्पर्धा असावी, असे आवाहन त्यांनी भाजपाच्या नेत्यांना केली.