Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

हुंडाबळी एक कलंक

Responsive Ad Here

 शीर्षक: हुंडाबळी एक कलंक






लघुलेख

सौ.सुधा बेटगेरी 


'हुंडाबळी' एक मोठी ज्वलंत समस्या आहे.

या 'हुंडा' पद्धतीलाआज आधुनिक नाव म्हणजे 'स्टेटस' अथवा 'प्रेस्टीज' असे सुधारित नाव दिले गेले आहे. या हुंडा पद्धतीमध्ये चूक कोणाची हुंडा मागणाऱ्या वर पक्षाची? अथवा हुंडा देणाऱ्या वधुपक्षाची? किंवा आई-वडिलांच्या धाकामुळे या विरोधात काही न बोलता गप्प बसून लग्न करणाऱ्या वधू-वरांची?? माझ्या मते इथे सगळेच जबाबदार आहेत. 


या विरोधात कानून बनलेला आहे. परंतु त्याचे पालन  कुठपर्यंत होत आहे?  आजही मुकाट्याने हुंडा हा घेतला जातो आणि दिला जातो. मुलगा किती एफिशियंट आहे अथवा मुलांचे घर किती एफिशियंट आहे हे दाखवण्यासाठी जेवढा जास्त होईल तेवढा हुंडा वर पक्षाकडून मागितला जातो. व वधूपक्षही आपण किती चांगल्या घरी दिले आहे हे दाखवण्यासाठी वर पक्षाचे मागणी  कबूल करतो. आणि आजकाल कानावर येणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे  आपली मुलगी सुखात राहावी म्हणून मुलीचे आई-वडीलच आग्रहाने सोने चांदी अशा वस्तू देतात. व त्यात त्यांना आपले स्टेटस  दाखवायचे असते.

हे कितपत बरोबर आहे??


आजकालचा समाज हा सुशिक्षित आहे. मुलं व मुली दोघेही सुशिक्षित आहेत. गरजेचे आहे की त्यांनी या गोष्टीचा विरोध करायला हवा. परंतु बऱ्याचदा असे होत नाही. 

आज मुलींनी जास्तीत जास्त शिकून आत्मनिर्भर राहण्याची आवश्यकता आहे. जेव्हाही हुंडाबळी सारखा अन्याय होऊ लागतो त्या वेळेला मुलीने आपल्या आई वडील व पोलिसांच्या मदतीने याचा विरोध हा केलाच पाहिजे. वेळेवरच तिने  जागृती दाखवली तर हुंडा मुळे जाणारा बळी टाळू शकतो.


हुंडाबळी हा समाज प्रगतीवर एक कलंक आहे. आजच्या आधुनिक युगामध्ये जिथे आपण जेंडर इक्वलिटीचे नारे लावतो, तिथे स्त्रियांवर हुंड्यासाठी  होणारे अन्याय  देशाची अधोगती दर्शवतात. आज आपण 21व्या युगात पदार्पण केले आहे. आज स्त्री कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही. पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. मग अशा मारक प्रथा ज्या देश प्रगतीला बाधक आहेत, ज्या समाजाला कलंक आहेत त्यावर युवापिढीनेच आवाज उचलला पाहिजे. व हुंडा देणे व घेणे या दोन्ही गोष्टीचा विरोध केला पाहिजे. तेव्हाच समाजामधून हा कलंक पूर्णपणे दूर होऊ शकेल व समाज एक सशक्त, प्रगतिशील समाज बनू .